नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण, शाहू-फुले-आंबेडकर व संत रविदास पुरस्कार सोहळा महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.
अनेक जण म्हणतात कि आठवले बरोबर कोणी नाही. पण त्यांनी माझ्याबरोबर देशभर फिरावे. असे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले.पूर्वीचा भाजप व आताचा भाजप यात बदल झाला आहे. या पक्षाने आपल्या सर्व भूमिकेत बदल केले आहेत.आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. मात्र, भाजपने आरक्षणाला धक्का लावला तर आम्ही पण त्यांना धक्का देऊ, असा सूचक इशाराही आठवले यांनी दिला.
आठवले यांनी नेहमीच्या काव्य शैलीत आपलो मनोगत मांडले ते म्हणाले कि देशाचे पंतप्रधांन आहेत नरेंद्र मोदी, आणि मी आहे खरा आंबेदरवादी, स्टेजवर आहे दिलीप कांबळे आणि रावसाहेब दानवेंनीची जोडी, तुम्ही चालवा दिल्ली कडे माझी गाडी, अशी खंत हि त्यांनी आपल्या काव्यशैलीतून व्यक्त केली. त्यांनी यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पक्षाला सांगावे. अशीं टीकाही आठवले यांनी केली.