नाशिक : बहुजननामा ऑनलाईन- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामधील गटांनी आपआपसातील हेवे दावे दूर करून एकत्र आले पाहिजे ते म्हणले कि मी प्रकाश आंबेडकर यांना पक्षाचा अध्यक्ष करण्यास तयार आहे. वंचित बहुजन आघाडी करून त्यांना सत्ता मिळणार नाही. ते माझ्यासोबत आले तरच ती मिळेल. असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते काळाराम मंदीर प्रवेश सत्याग्रहींना रिपाइंच्या अभिवादन सभेत ते बोलत होते.
पंचवटीतील श्री काळाराम मंदिर सत्याग्रहास ८८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रिपाइंच्या वतीने शनिवारी महामेळावा व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाशेजारील ईदगाह मैदानावर सायंकाळी ६ वाजता या मेळव्यास प्रारंभ झाला.त्याला नाशिक करणारांनी प्रचंड प्रतिसाद दिला.आठवले यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांसह रिपाइंचे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत मंत्री जानकर म्हणाले. की काँग्रेसनी बहुजनांची समाजाची मते घेऊन ७० वर्षांपासून फसवण्याची भूमिका घेतली आहे. पण. सध्याचे सरकार सर्वांच्या हिताचे निर्णय घेत असून. फसवण्याच्या वृत्तीला फाटा देत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आपला नेता नक्कीच कॅबिनेट मंत्रीमंडळात असेल. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.