नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सरकारला मात देण्यासाठी ५६ पक्ष एकत्र येऊन महाआघाडी स्थापन केली होती मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यात फाटाफूट झाली. उत्तरेकडील राज्यांमध्ये सपा आणि बसपा आघाडी कॉंग्रेससाठी अडचणीचे ठरू शकते. परंतु सर्व विरोधकांचे लक्ष मोदींना पराभूत करणे हेच असून योग्य वेळी सर्व विरोधक एकत्र येतील, असा विश्वास कॉंग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केला आहे.
पित्रोदा म्हणाले, लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसने प्रत्येक राज्यातील परिस्थीतीनुसार लढण्याचा निर्णय घेतला असल्याने काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांशी आघाडी होवू शकली नाही. सगळ्या विरोधकांचे ध्येय एकच आहे, सर्वांना लोकशाही आणि शांतता हवी आहे त्यामुळे सर्व विरोधी पक्ष एकमेकांच्या संपर्कात आहेत. जेव्हा गरज पडेल तेव्हा ते एकत्र येतील, असे त्यांनी सांगितले. मात्र, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंतप्रधानच्या उमेदवारीबाबत बोलण्याचे टाळले आहे.