नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ सदस्य अजित पवार यांनी बुधवारी विधानसभा कामकाजाच्या नियमावर बोट ठेवत शिवसेनेचे कान टोचले. या मागील कारण म्हणजे ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या जागेऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेजारच्या आसनावरून कामकाज मांडले. ती बाब खटकल्याने सदस्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जागेवरूनच बोलले पाहिजे, असे पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ सदस्य अजित पवार यांनी बुधवारी विधानसभा कामकाजाच्या नियमावर बोट ठेवत शिवसेनेचे कान टोचले. बुधवारी ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या जागेऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेजारच्या आसनावरून कामकाज मांडले.
आज कामकाजाच्या सुरुवातीला समित्या आणि महामंडळाचे अहवाल सभागृहात ठेवण्यात आले. शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर मांडत होते. अहवाल ठेवताना देसाई हे त्यांना नेमून दिलेल्या जागेऐवजी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागेवर बसले. त्यास अजित पवारांनी आक्षेप घेतला. त्याला भाजपाच्या सदस्यांनीही मग आक्षेपाची जोड दिली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वच सदस्यांनी हा नियम पाळला पाहिजे, अशी सूचना दिली.ती बाब खटकल्याने सदस्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जागेवरूनच बोलले पाहिजे, असे पवार यांनी सांगितले. त्यांच्या या विरोधाला भाजपाने देखील दाद दिली आणि भाजप सदस्यही अजित पवारांच्या सुराला सूर मिळवू लागले. तथापि, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गदारोळ थांबवला आणि सांगितले की सर्वच सदस्यांनी हा नियम पाळला पाहिजे.
सुभाष देसाई यांचे अहवाल मांडून झाल्यानंतर अजित पवार बोलायला उभे राहिले. त्यांनी विधानसभा कामकाजाच्या नियमाकडे लक्ष वेधले. मंत्री असो किंवा विरोधी पक्षनेता असो, सभागृहातील सर्व सदस्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जागेवर बसूनच बोलले पाहिजे. सदस्यांनी ठरवून दिलेल्या जागेवरूनच बोलायचे असते आणि ही पद्धत पाळली गेली पाहिजे, असे पवार म्हणाले. पवारांच्या या सूचनेचे भाजप सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.
Visit : bahujannama.com