मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातच कंगनाने पुन्हा एकदा एक ट्विट केल्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. एका महान पित्याचा पुत्र होणं, हे एकमेव कर्तृत्व होऊ शकत नाही. मला महाराष्ट्राच्या प्रेमाचे किंवा द्वेषाचे प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण ? असा सवाल करत कंगना राणौतने ट्विटरच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1301880314155864065
कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एक महान पित्याचा पुत्र होणं, हे एकमेव कर्तृत्व होऊ शकत नाही. मला महाराष्ट्राच्या प्रेमाचे किंवा द्वेषाचे प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण ? तुम्ही माझ्यापेक्षा महाराष्ट्रावर जास्त प्रेम करता हे तुम्ही कसे ठरवले ? आता मला तिथे येण्याचा अधिकारही नाही ? असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे. तसेच या ट्विटला #ShameOnMahaGovt असा हॅशटॅग तिने वापरला आहे. कंगनाच्या या ट्विटमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1301857130090127360
दरम्यान, मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा, असं कंगणाने धमकी देणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. कंगणाने पुढे स्माईल अपलोड करत म्हटलं आहे की, 9 सप्टेंबर रोजी मी मुंबईत येईल. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी वेळ सांगेन. सोशल मीडियावरुन धमक्या देणाऱ्यापैकी कुणामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं ओपन चॅलेंज तिनं धमक्या देणाऱ्यांना दिलं आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1301855363554107393