बहुजननामा ऑनलाईन – भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्रातील पाच वरिष्ठ अधिकार्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवी दिल्लीतील प्रवासी भारतीय केंद्रात कल्पकता आणि प्रशासन या विषयावर दीनदयाल संशोधन संस्था आणि युनायटेड नेशन ग्लोबल काम्पेक्टच्या वतीने डॉ. एपीजे अब्दुल कलाम परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी देशातील विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी पार पाडणाऱ्या अधिकार्यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे यामध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी.बक्षी, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामीण उद्योग बोर्डाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाचे आयुक्त राजीव जलोटा, महाराष्ट्र औघोगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अन्बलगन , ठाणे शहरातचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर या पाच अधिकार्यांना त्यांनी प्रशासनामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शहरात सुरक्षाव्यवस्था अबाधित राखण्यात व्यस्त असल्याने दिघावकर यांना पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीत उपस्थित राहता आले नाही.