अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – १० टक्के आर्थिक आधारावर आरक्षण व ईव्हीएम संबंधित निवडणूक आयोगाद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केल्याविरोधात संविधान बचाव संघर्ष समितीचे शेकडो कार्यकर्ते जिल्हाकचेरीवर धडकले. १० टक्के आर्थिक आधारावर आरक्षणाचा विरोध व ईव्हीएम संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अवहेलना निवडणूक आयोग करीत असल्याने याविरोधात रोष व्यक्त केल्या जात आहे.
त्यामुळे भारतभरात ५ कोटी हस्ताक्षर अभियान राबविण्याचा निर्णय संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने केला आहे. याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो कार्यकर्त्यांचा मोर्चा धडकला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात सुनील डोंगरदिवे, बंटी रामटेके, मनीष साठे, दिव्या खंडारे, श्वेता क्षीरसाठ, ललीता तायवाडे, आरती काळबांडे, नीता खंडारे, करण मोंढे, सुदाम बोरकर, करिष्मा मेश्राम, निशाखा दहाड, सुनीता सोनोने, सविता चव्हाण, गीता खेडकर, विमल गवई आदींसह शेकडोंची उपस्थिती होती.