बहुजननामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्रात २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्यात येणार आहे; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेईल, असं शालेय शिक्षण विभागानं सांगितलं आहे. एकीकडं लॉकडाउन पुन्हा होईल का? हा प्रश्न लोकांच्या मनात पडला आहे. कारण, गेल्या काही दिवसांत असंच वाटू लागलं (Coronavirus)आहे. covid-19 च्या रुग्णांमध्ये घट होत असली, तरी अद्यापही काही ठिकाणी परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. नोव्हेंबर महिन्यात रुग्ण घटण्याऐवजी वाढतच चालली आहे, अशा परिस्थितीत काटेकोरपणे पालन होणे गरजेचं आहे.
केंद्र सरकारने अनलॉकअंतर्गत पहिल्या टप्प्यात नऊ ते बारा त्यानंतर सर्व शाळा उघडण्यास परवानगी दिली होती. महाविद्यालय आणि विद्यापीठांना ही वर्ग घेण्यास परवानगी दिली होती. अशा परिस्थितीत काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शाळा उघडल्या गेल्या आहेत. गुजरातने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. तसंच, मिर्झापूर, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने ३० नोव्हेंबर पर्यंत लॉकडाउन वाढविला होता. शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत गुजरातच्या अहमदाबादमध्ये “फुल कर्फ्यू” लागू करण्यात आला आहे. दिल्ली सरकार नाही कडक अंमलबजावणी सुरू केली आहे त्याचबरोबर काही राज्यांनी रुग्ण संख्या वाढत असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कन्टेन्ट झोनमध्ये पूर्णपणे लॉकडाउन होण्याची शक्यता आहे ती अत्यंत मर्यादित क्षेत्रात लागू होऊ शकते.
गुजरात अहमदाबाद महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या परिसरात शुक्रवारी रात्रीपासून ५७ तासांचा कर्फ्यु लावण्यात आला आहे. दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवार (ता. २०) नोव्हेंबर रात्री नऊ वाजता सुरू होईल. सोमवारी (ता. २३) सकाळी सहापर्यंत सुरू राहणार आहे.
अतिरिक्त मुख्य सचिव राजीव कुमार गुप्ता म्हणाले, की या पूर्ण कर्फ्यू दरम्यान फक्त दूध, औषधांचे दुकान खुली राहतील. गुजरात सरकारनं २९ नोव्हेंबर पासून राज्यात माध्यमिक शाळा व महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय थांबविला आहे. अरविंद केजरीवाल सरकारनं कोरोना हाताळणेबाबत कोठार उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्या दोन हजार रुपयांचा दंड जाहीर केला आहे. आतापर्यंत मास्क न घातल्याबद्दल पाचशे रुपयांच्या दंडाची तरतूद होती. सर्वपक्षीय बैठकीनंतर केजरीवाल यांनी घोषणा केली. दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. या व्यतिरिक्त दिल्ली सरकारनं ही केंद्राला स्थानिक पातळीवर बाजारात लॉकडाउन लागू करण्याची परवानगी देण्यास सांगितला आहे. दिल्लीत विवाह सोहळा मधील उपस्थिती २०० वरून ५० वर करण्यात आली आहे. माइक्रो कंट्रोल झोनमध्ये कठोरपणा केला जात आहे. ही पद्धत देशभर अवलंबली जात आहे. तेथे एक नवीन रुग्ण आढळले आहेत. तेथे ५० मीटरच्या परिसरात आयसोलेशन करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच, राज्यात घरोघरी जाऊन कुटुंबाची चाचणी करण्याचेही काम सुरू आहे.