शिर्डी : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी त्यांचा रिमोट कोण चालवतं यापेक्षा राज्याचा विकास मह्त्वाचा आहे. मूळ विषयाला बगल देणं थांबवावं असा टोला भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला याबरोबरच पंकजा मुंडे यांचे औरंगाबादेत विविध मागण्यांसाठी लक्षणिक उपोषण सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाला राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. विखे पाटील शिर्डीत बोलत होते.
नाईट लाईफची चिंता करण्यापेक्षा शेतकऱ्यांची चिंता करा
यावेळी बोलताना विखे पाटील यांनी अनेक प्रश्नांवरून महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले ते म्हणाले, अतिवृष्टीच्या पंचविस हजार मदतीचे काय झालं…? सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाचं काय झालं..? असे सवाल करत महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या पुन्हा वाढल्या असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरोप केला. नाईट लाईफची चिंता करण्यापेक्षा शेतकऱ्यांची चिंता करा, असा सल्लाही विखे पाटील यांनी सरकारला दिला. तीन तिघाडी आणि काम बिघाडी, असं काहीसं या सरकारचं झालं आहे .नव्याने सरकार स्थापन झालंय. राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना शुभेच्छाच, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले ते म्हणाले , मराठवाडा वाॅटर ग्रीडच्या कामाला गती देण्याची आवश्यकता असताना स्वर्गीय बाळासाहेब विखेंना श्रेय जाईल, म्हणून सर्वांनी विरोध केला. मात्र, आता पाण्याच्या प्रश्नासाठी सर्वजण भांडताहेत याचा आनंद असल्याचे सांगत विखे पाटील यांनी सरकारला उपहात्मक टोला लगावला.गोदावरीची तूट भरून काढली तर नगर नाशिकसह मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. प्रादेशिक वाद निर्माण करण्यापेक्षा सरकारने पाणी प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.
Visit : bahujannama.com