मुंबई : वृत्तसंस्था – अर्थसंकल्पात देशातील भटक्या-विमुक्त जातींच्या विकासाला गती देण्यासाठी स्वतंत्र कल्याण विकास मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. या मंडळामुळे राज्यातील सुमारे ८२ लाख भटक्या-विमुक्तांना लाभ होण्याची शक्यता आहे.
देशातील भटक्या- विमुक्तांना विकासाच्या गंगेत आणण्यासाठी नीती आयोगाच्या अंतर्गत विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रात ३७ भटक्या, १४ विमुक्त जाती आहेत. ‘या जातींची राज्यातील लोकसंख्या २०११ च्या जनगणेनुसार ८२ लाख ६७ हजार इतकी आहे. राज्यात विमुक्त जातीला ३%, भटक्या जातीतील ब, क, ड गटांना एकत्रित ८% आरक्षण आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र कल्याण विकास मंडळ स्थापन होणार आहे. यामुळे राज्यातील सुमारे ८२ लाख भटक्या-विमुक्तांना लाभ होण्याची शक्यता आहे.