मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ओडिशाच्या एका खेड्यात आपल्या मुलाने आणि सुनेने केलेल्या गैरवर्तनाला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने असे पाऊल उचलले आहे. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पत्रकार असलेल्या त्या वृद्ध व्यक्तीने आपली संपत्ती सरकारला लिहून दिली. त्या वृद्ध व्यक्तीची अशी इच्छा आहे की, त्याच्या जमिनीवर एक वृद्ध आश्रम बनवलं जावं. तेथे वृद्ध त्यांच्या जीवनातील शेवटच्या क्षणासह जगू शकतील.
हे प्रकरण जाजपुरच्या दशरथपुर प्रखंडा मधील मुरारीपुर गावातले आहे. वृद्ध खेत्रमोहन मिश्रा ७५ वर्षाचे आहेत. त्यांनी सांगितले की, मुलगा आणि सुनेची वर्तणुक चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी आपली पूर्ण जमीन सरकारच्या नावावर केली आणि ते आपली पुढची आयुष्य वृद्धाश्रमात घालवायचे इच्छित आहेत. या संदर्भात जाजपूर जिल्हाधिकारी (कलेक्टर) रंजन के दास म्हणाले की, प्रशासनाने वृद्ध व्यक्तीची राहण्याची व्यवस्था चंडीखोले जवळील वृद्धआश्रमात केली आहे.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थि देखील मुलाच्या आणि सुनेच्या स्वाधीन करण्यात येऊ नाहीये अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. अधिकारीने सांगितले की, त्या वृद्ध व्यक्तीची अशी इच्छा आहे की, त्याच्या जमिनीवर एक वृद्ध आश्रम बनवलं जावं. अधिकाराने सांगितले की, जिल्हा प्रशासनाने त्यांच्या जमिनीवर वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतला आहे.