लखनऊ : वृत्तसंस्था – राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक दिवसांपासून शहर ते खेडेगावात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत ५४ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना मदतकार्यात करण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुसळधार पावसामुळे १६१ घरे उध्वस्त केली. त्यात १७ जनावरेही मरण पावली आहेत. बहुतेक मृत्यू पावसात पडणारी झाडे, कोसळलेल्या भिंती, छप्पर कोसळल्याने झाले असून १२ लोक जखमीही झाले आहेत.
उत्तराखंड हवामान विभागाने शनिवारीसह डेहराडूनसह सहा जिल्ह्यांत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामानशास्त्र केंद्राचे संचालक बिक्रम सिंह म्हणाले की, शनिवारी देहरादून, रुद्रप्रयाग, नैनीताल, पिथौरागड, बागेश्वर येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर बिहारमधील २५ जिल्हयांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान बदलामुळे पटना सोबतच संपूर्ण राज्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
राज्यात मान्सूनच्या क्रियेत वाढ आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या दिशेने चक्रीय वाऱ्याच्या परिणामी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांवर परिणाम झाला आहे. दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या सध्याच्या कामकाजाचा विचार करता हवामान खात्याने मान्सूनच्या परतीच्या प्रारंभाचा कोणताही अंदाज पुढील दोन ऑक्टोबरनंतरच व्यक्त केला जाऊ शकतो, असे सांगून नियोजित वेळेतून माघार घेण्याची शक्यता नाकारली आहे. सर्वसाधारणपणे मान्सूमाची परती पश्चिम राजस्थानपासून सुरू होते.
Visit : bahujannama.com