बहुजननामा ऑनलाईन टीम – राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. भाजपचा उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नाही. पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर शिवसेना अडून बसली आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे सत्तास्थापन तर दुसरीकडे महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाचा प्रश्न आ वासून उभा आहे. या सर्व पार्श्वभुमीवर भाजपा नेत्यांची महत्त्वाची आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी बैठक पार पडली.
Chandrakant Patil, BJP Maharashtra President after party meeting: People have given mandate to BJP-Shiv Sena alliance,we'll honour that mandate & form govt. Shiv Sena is yet to give any proposal. BJP's doors are always open for Shiv Sena. https://t.co/22hb25VeWE pic.twitter.com/T5Upqia3Y2
— ANI (@ANI) November 5, 2019
बैठक पार पडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या प्रस्तावासाठी भाजपची दारे २४ तास उघडी असल्याचे म्हंटले आहे. ते पुढे म्हणले कि, सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेच्या प्रस्तावासाठी भाजप कायम तयार आहे. तसेच भाजपच्या कोअर कमेटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचे ठरले असून राज्यात लवकरच युतीचे सरकार स्थापन करण्यात येईल असे पाटील यांनी सांगितले. मात्र, बैठकीमध्ये इतर मुद्यांवर झालेल्या चर्चां संदर्भात सांगण्यास त्यांनी नकार दिला.
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील बैठकीनंतर बोलताना पत्रकारांशी संवाद साधताना लवकरच गोड बातमी येईल असे सांगत युतीचे सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. तसेच या बैठकीमध्ये झालेल्या चर्चे सदर्भात आणि प्रस्तावाबात जाहीरपणे बोलू शकत नाही असेही ते म्हणाले . यावेळी पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते.