नवी दिल्ली : आजपासून सुरु होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वीच १८ राजकीय पक्षांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे़ यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, अकाली दल या मोठ्या पक्षांचा समावेश आहे.
गेल्या अधिवेशनात केंद्र सरकारने ज्या प्रकारे तिन्ही कृषि कायदे मंजूर केले, त्याची पद्धत योग्य नव्हती. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेसह १६ पक्षांनी २९ जानेवारी रोजी संसदेत होण्या राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषि कायद्याविरोधात विरोधकांनी हा निर्णय घेतला आहे़
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोध करणार्या पक्षांमध्ये काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, डीएमके, राजद, आरजेडी, सीपीआय -मार्क्सवादी, सीपीआय, आययुएमएल, आरएसपी, पीडीपी, एमडीएमके, केरळ काँग्रेस आणि एआययुडीएफ या पक्षांनी संयुक्त निवेदन काढून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर आम आदमी पार्टी आणि शिरोमणी अकाली दलानेही बहिष्कार टाकण्याची घोषणा केली.