गडचिरोली वृत्तसंस्था – देशभरातील नऊ राज्यांमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकींमध्ये ११९ नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यात ३९ नक्षलवादी महिलांचा समावेश असल्याची कबूली नक्षलवाद्यांनी दिली आहे. तर २८ जूलै ते ३ ऑगस्टदरम्यान अमर शहीद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी पत्रकाद्वारे केले. नक्षलींनी एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी, कोरची, कुरखेडा परिसरात वाटलेली ही पत्रके मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत.
दंडकारण्य चळवळीतील कॉ. नर्मदा आणि करणकुमार यांना अटक करण्यात आली. त्यानंतर ही चळवळ खिळखिळी झाली. मात्र वर्षभरात बिहार, तेलंगणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडीशा, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकींमध्ये ११९ नक्षलवादी ठार झाले आहेत. यात पाच डिवीसी सदस्य, मीना, रोशनी उर्फ बंददो, भीमा उर्फ सुर्या, रामको नरोटी, जमुना , २० पीपीपी सदस्य, २० जन पार्टी, पीएलजी सदस्य, जन मिलीशायाचे १३ आरपीसीची अध्यक्ष ८ आणि जन संगठनचे ४२ असे नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यात ठार झालेल्या ९ नक्षलवाद्यांची माहिती मिळालेली नाही.
वर्षभऱात पुर्वेत्तर झारखंडमध्ये १, जनदंडकारण्यातील ९६, आंध्रप्रदेशी-ओडीशा १४, तेलंगणा १, बिहार व झारखंडमध्ये ३ मध्यप्रदेशात २, महाराष्ट्र, छत्तीसगडमध्ये २, आंधप्रदेश १ अशी राज्यांमध्ये चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलींची संख्या आहे. नक्षलवाद्यांनी पत्रके वाटून शहिद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन तर केलेच आहे. परंतु नर्मदा आणि किरणकुमार यांना बिनशर्त सोडून द्यावे अशीही मागणी केली आहे.