लातूर : बहुजननामा ऑनलाईन- सर्व सामान्यांच्या हिताचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना जनता डोक्यावर घेते. मात्र, स्वत:चे हीत जोपासत राजकारण करणाऱ्या नेत्यांसोबत दुसरे काय होणार? हे तर गल्ली बोळातील नेते आणि अशाच नेत्यांवर अधिक हल्ले होत आहेत, अशी टीका भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार रामदास आठवले यांच्यावरील झालेल्या हल्ल्याबाबत केली आहे. उदगीर येथे भारिप महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसीच्या संघटनांशी बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, समाजाच्या हिताचे राजकारण करणे रामदास आठवले यांनी सोडले असून सत्तेची भूरळ त्यांनाही लागली आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर अंबरनाथ येथे झालेला हल्ला हा काही विशेष नसून अधिकतर असे हल्ले गल्ली बोळातील नेत्यांवरच होत असल्याचे त्यांनी म्हटले. विशेष म्हणजे असे मत आंबेडकर यांनी व्यक्त करताच यावेळी उपस्थितीत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आगामी काळात काँग्रेससोबत आली तर अन्यथा त्यांच्याविना बहूजनांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी लोकसभेच्या सर्व जागांवर लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.