आरक्षण म्हणजे विकासाचे साधन नाही हे फक्त आश्वासन…
अवघ्या काही दिवसांवरच लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या असतांना देशाचे अर्थमंत्री शोधण्याची वेळ आली आहे.ऑक्टोबर , नोव्हेंबरमध्ये शेतकर्यांना भाजप सरकारने हमीभाव जाहीर केला होता. तो अद्यापही मिळाला नाही. स्व. यशवंतराव चव्हाणांनी शेतकर्यांसाठी बाजार समित्या व पर्यायी बाजारपेठ उभ्या केल्या. त्यावर व्यापार्यांचा एकच प्रतिनिधी जाणार अशी तरतूदही करण्यात आली; मात्र या बाजारपेठेत व्यापार्यांशी हातमिळवणी करत सत्ताधार्यांनी वारंवार शेतकर्यांना लुटण्याचे काम सुरू केले आहे. या समित्यांवर शासनाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे शेतकर्यांना न्याय मिळणार आहे. सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी सत्ता आली पाहिजे. संविधानामध्ये सुध्दा अधिकाराची चौकट केली पाहिजे. आज जेथे तेथे आरक्षणाचा विषय सुरू आहे. वैचारीक दिवाळखोरी समोर आलेली आहे. आरक्षण म्हणजे विकासाचे साधन नाही हे फक्त आश्वासन आहे.याचाच अर्थ अगोदरच्या व्यवस्थेत आपल्याला स्थान नव्हते ते आता नक्की झाले आहे असा त्याचा अर्थ होतो.
‘या’ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार प्रकाश आंबेडकर…
नोटबंदीच्या मुद्यावर बोलतांना ते म्हणाले काळा पैसा पांढरा कसा करायचा यासाठी नोटाबंदी करण्यात आली त्यामध्ये सातारचा काळापैसा मात्र बाहेर आलाच नाही. तसेच हवाला मार्केट बंद झाले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नोटा बदलून केले काय तर उलट या सरकारने देशाची लूट केली आहे.कच्चा तेलाचा भाव एकदम खाली आला.यातून 3 वर्षात 1 लाख 20 हजार कोटी रूपयांचा नफा झाला ते गेले कुठे ? त्याचा हिशोब कोण मांडणार .लुटारू सरकारने तेलातील मिळालेला नफा खाल्ला का? असा प्रश्नही आंबेडकर यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर न्यायव्यवस्थेवरील विश्वास संपवण्याचे काम देखील भाजपा व आरएसएस करत आहे. संविधानावर लोकांचा विश्वास आहे आणि लोकांचा विश्वास हेच माझे भांडवल आहे. संविधानाने विकासाची दारे उघडली आहेत. संविधान चिरंतर रहायचे असेल तर सातार्यात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा करावाच लागेल. त्यासाठीच प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर या दोन ठिकाणाहून लोकसभेला उभे राहणार असल्याचे माजी आमदार लक्ष्मण माने यांनी जाहीर केले.यावेळी आकाश पवार, सचिन माळी, सुनील वाघमारे, शंकरराव लिंगे, नवनाथ पडळकर, हरिभाऊ भदे, अस्लम सय्यद, चंद्रकांत खंडाईत यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अदिनाथ बिराजे यांनी प्रास्ताविक केले.सिध्दार्थ खरात यानी सुंत्रसंचालन केले.