भुईंज : बहुजननामा ऑनलाईन – युवा पिढीला डॉ. बाबासाहेब आबेडकर यांनी लिहिलेली घटना आणि संविधानाचा विसर पडू नये म्हणून बार्टी पुणे मार्फत वाई तालुक्यात संविधान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा वर्ग टीव्ही, आणि मोबाईलच्या आहारी गेला आहे. मात्र ही परिस्थिती भयानक असून पुढील युवा पिढीला डॉ. बाबासाहेब आबेडकर यांनी लिहिलेली घटना आणि संविधानाचा विसर पडू नये यासाठी वाई तालुक्यातील प्राथमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये आणि पोलिस ठाण्यात, संस्थेचे जिल्हा प्रकल्प अधिकारी दिलीप वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्टी पुणे मार्फत वाई तालुक्यात संविधान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान समता दूत मालन गिरीगोसावी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय घटनेची आणि संविधानाचा विसर पडू नये म्हणून या विषयी प्रत्येक ठिकाणी जाऊन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यावेळी संविधानाच्या प्रती आणि संविधानाच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.