मुंबई : मुंबईची तुलना पीओकेशी केल्याच्या मुद्द्यावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत वरील रोषानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी आज थोडा नमतापणा घेतला आहे. संजय राऊत म्हणाले की, कंगना सोबत माझा काही वैयक्तिक राग नाही हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे.
संजय राऊत ‘आजतक’शी बोलताना म्हणाले की, कंगना सोबत माझा काही वैयक्तिक राग नाही हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. तिने तिच्या ट्विटर हॅण्डलरचा वापर स्वतः केला पाहिजे. राजकीय पक्षांना याचा वापर करण्याची परवानगी नाही दिली पाहिजे. हा शिवसेने पुरता मुद्दा नाही, हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे त्यामुळं सर्वांनी एकत्र आलं पाहिजे.
संजय राऊत शुक्रवारी म्हणाले होते की मुंबई मराठी माणसाच्या बापाची आहे. शिवसेना महाराष्ट्राच्या अशा शत्रूंना संपवल्याशिवाय गप्प राहणार नाही. त्यांनी या ओळीसोबत ‘प्रॉमिस’ असं देखील लिहिलं.
जेव्हापासून कंगना रनौतने मुंबईची तुलना पीओकेशी केली तेव्हापासून वाद सुरू आहे. कंगनाचं हे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरुद्ध होतं. कंगना रनौतने शुक्रवारी सांगितले की ती 9 सप्टेंबरला मुंबईत परत येत आहे. कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा, 9 सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. मी मुंबईत पोहचल्यानंतर टाइम पोस्ट करेल, कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा. आता संजय राऊत आणि कंगनाच्या वादात राज ठाकरेंची पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतली आहे. मनसेने सांगितलं कि कंगनाच्या विरोधात राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा.