बुलडाणा : बहुजननामा ऑनलाईन – २८ डिसेंबरला माळी समाजातर्फे शेगाव येथे लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय भागीदारी मिळावी या मागणीसाठी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना या परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
बुलढाणा येथे बुधवारी ( ५ डिसेंबर ) वंचित माळी या पोस्टरखाली माळी समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय भागीदारी मिळावी म्हणून माळी समाजातर्फे २८ डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले आहे असे अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र महाडोळे यांनी म्हंटले आहे.
यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनुने, अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र महाडोळे, बाळापूरचे भारिप-बमसंचे आमदार बळिराम सिरस्कार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा माळी समाजाची राजकिय महत्वाकांक्षा जागृत करून वंचित बहुजन आघाडीसोबत समाज जोडण्यासाठीचा डाव असावा अशी शक्यता वर्तवल्या जात आहे. इतकेच नव्हे तर माली समाजाच्या या एल्गार परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी फक्त भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरच का ? असा सवालही उपस्थित होत आहे.