पुणे : पुढारीनामा ऑनलाईन – चंद्रशेखर आझाद यांच्या सभांना उच्च न्यायालयाने नकार दिल्या नंतर त्यांनी आज पुण्यात दाखल होत गंज पेठ येथील फुले वाड्यात जाऊन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल याच्या प्रतिमांना अभिवाद केले आहे. मी जिथं जातो त्या राज्यातून भाजपचे सरकार जाते असा खोचक टोला लगावून चंद्रशेखर यांनी राज्य सरकारने केलेल्या नजर कैदीचा आणि अटकावाचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न केला आहे. फुले वाडयात महात्मा फुले यांना अभिवादन केल्या नंतर चंद्रशेखर यांनी लाल महालाला हि भेट दिली आहे.
भाजप सहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधत चंद्रशेखर म्हणाले कि ,२०१९ भाजप सत्तेवर पुन्हा निवडणून येणार नाही आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. लाल महाल बाहेर पत्रकारांशी चंद्रशेखर यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हि टीका केली आहे. मी ज्या राज्यात जातो त्या राज्यातील भाजपचे सरकार जाते म्हणून महाराष्ट्रातून हि भाजप सरकार हद्दपार होणार आहे असे चंद्रशेखर आझाद म्हणाले आहेत.
मी उद्या भीमा कोरेगावला जाणार असून मला तिथं जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असे चंद्रशेखर आझाद म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे त्यांच्या नजर कैदेत ठेवण्याच्या सरकारच्या कृतीवर हि त्यांनी निशाणा साधला असून त्यांनी सरकारवर बोचरी टीका केली आहे. मला नजर कैदेत ठेवायला मी काय दहशतवादी आहे का असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला असून भीमा कोरेगाव येथे दंगल भडकवणारे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे खुले आम फिरत असून मला मात्र रोखण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
चंद्रशेखर आझाद यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे चांगलाच वाद उभा झाला असून त्यांच्या टीकेला भाजपच्या वतीने उत्तर दिले जाणार का हे पाहण्या सारखे राहणार आहे.आज सकाळीच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली आहे. पुण्यातील सभेला परवानगी नाकारल्याने त्यांनी सध्या पध्द्तीने महात्मा फुले वाड्यात येऊन अभिवादन केले त्यानंतर लाल महलाला भेट देऊन तेथे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यात त्यांनी महाराष्ट्रात भीम आर्मीचे संघटन वाढवणार असल्याचे म्हणले आहे.