नागपूर : पुढारीनामा ऑनलाइन – मारवाडी समाज एकेकाळी गरिबांची पिळवणूक करणारा समाज म्हणून ओळखला जायचा, असे वक्तव्य काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपुरात मारवाडी फाऊंडेशनद्वारे दिल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत असताना त्यांनी हे विधान केले आहे.
यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, मारवाडी समाज एक लोटा आणि एक पंचा घेऊन मारवाड मधून आला.
मात्र मेहनत व नशिबाच्या जोरावर त्यांनी पैसा कमावला आणि आज तेच मारवाडी समाज बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार देत आहे. हे सकारात्मक चिन्हे असल्याचे मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ सुखदेव थोरात यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार देण्यात आले.
एखादे राजकीय लाभ घेण्यासाठी, एखादी सीट मिळवण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणे योग्य नाही, असेही शिंदे म्हणाले. इतकेच नाही तर, आज बाबासाहेबांचे विचार संपवण्याचे प्रयत्न होत आहे. त्यामुळे अनुसूचित समाजाने सावध राहण्याची गरज असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.