लखनऊ : वृत्तसंस्था – जाती जातींच्या दंगलीत फक्त सामान्य लोकांचाच मृत्यू का होतो ? राजकीय नेते का नाही मरत ? असा प्रश्न सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष ओ. पी. राजभर यांनी उपस्थित केला. मात्र त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे नवीन वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.
आगामी निवडणुकांसाठी अलीगडममध्ये सुहेलदेव बहुजन समाज पक्षाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान हिंदू मुस्लिम दंगलीत एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचा कधी मृत्यू झाला का ? राजकीय नेत्यांचा मृत्यू का होत नाही ? असा प्रश्न सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष ओपी राजभर यांनी उपस्थित केला. इतकेच नव्हे तर, धर्माच्या आधारे भांडणं लावत फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय नेत्यांना जिवंत जाळले पाहिजे. यानंतरच त्यांना कळेल आणि इतरांना जाळणे बंद करतील. असेही ते म्हंटले. इतकेच नव्हे तर जे राजकीय नेते नेहमीच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडतात. मात्र राज्यघटनेने आपल्याला, भारताचा नागरिक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. असेही ते म्हंटले.
विशेष म्हणजे, सुहेलदेव बहुजन समाज
पक्षाचे अध्यक्ष ओपी राजभर यांनी शनिवारी एनडीएमधून बाहेर पडण्याची धमकी
दिली होती. मात्र भाजपाचा पराभव करण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज
पक्षाने केलेल्या आघाडी नंतर राजभर यांनी ही धमकी दिली आहे. इतकेच नव्हे तर
राजभर यांनी निवडणूक एकत्रित लढवायची आहे की नाही याचा विचार करण्यासाठी
भाजपाला वेळ दिला आहे. इतकेच नव्हे तर भाजपाकडून वेळेत उत्तर आले नाही तर
आपला पक्ष सर्व ८० जागांवर निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी म्हंटले.