सातारा : बहुजननामा ऑनलाईन – गौतम बुद्ध यांच्या विचारांचा खोल प्रभाव राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वर होता. इतकेच नव्हे तर महात्मा गांधी हे स्वतः धर्म निष्ठ होते. तरीही ते धर्मनिरपेक्ष राज्याचे पुरस्कर्ते होते. याचबरोबर भारत हिंदू राष्ट्र करण्यास तसेच गोहत्या बंदी कायदा करण्यास त्यांचा तीव्र विरोध होता. असे मत राजकीय विश्लेषक, जेष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानतर्फे थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन कारण्यात आले होते. दरम्यान राजकीय विश्लेषक, जेष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी “महात्मा गांधींची धर्म कल्पना” या विषयावर आपले मत व्यक्त केले. ते म्हंटले, गौतम बुद्ध यांच्या विचारचा खोल प्रभाव राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वर होता. इतकेच नव्हे तर महात्मा गांधी हे स्वतः धर्म निष्ठ होते. तरीही ते धर्मनिरपेक्ष राज्याचे पुरस्कर्ते होते. याचबरोबर भारत हिंदू राष्ट्र करण्यास तसेच गोहत्या बंदी कायदा करण्यास त्यांचा तीव्र विरोध होता. याचबरोबर महात्मा गांधीचा सनातन धर्म हा नित्यनूतन धर्म होता. संत तुकाराम महाराज यांच्या प्रमाणे वेद, स्मृती पुराणातील सर्वच ग्रंथांचा अर्थ भाष्यकारांच्या पलीकडे जाऊन लावण्याचा अधिकार लोकांना असला पाहिजे या भूमिकेतून धर्म चिकित्सेचा आग्रह धरुन परंपरा आणि साहित्याबाबतचा द्रुष्टीकोन जोपासला. धर्माच्या आधारावर समाजात भेदभाव, द्वेष निर्माण करणे व राजकारणासाठी त्याचा वापर करता कामा नये. देव धर्म मानने नमानण्याचे स्वातंत्र्य लोकांना असले पाहिजे. लोकांनी निर्भय बनावे, त्यांचे नैतिक उन्नयन व्हावे, चांगल्या लोकांनी राजकारणात आले पाहिजे. यासाठी ते आग्रही होते. असे ते म्हंटले.