ए्खाद्या कलाकाराच्या संघर्षाच्या काळात अनेक काही वेगवेगळ्या घटना असतात. वेगवेगळे अनुभव असतात. यात अपमान फजिती असे अनेक किस्से असतात. या अनुशंगाने या कर्यक्रमात मकरंद अनासपुरेनं सयाजी शिंदे यांना एखादा अपमान लक्षात राहिलेला तुझ्या आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना सयाजी शिंदे यांनी संघर्षाच्या काळातील एक प्रसंग सांगितला. ज्यात त्यांनी आपला स्वाभिमान जपण्यासाठी ३० दिवसांत २४ मेमो येऊनही त्यांनी आपल्या व्यवस्थापकाला नमस्कार केला नाही.
सयाजी शिंदे म्हणाले की, “मी बँकेत कामाला होतो. त्यावेळचे माझे व्यवस्थापक रोज मला ते आल्यावर आणि जाताना त्यांना नमस्कार करायला सांगायचे. मी म्हणालो, मी पण बँकेत काम करतो, तुम्हीपण इथेच काम करता. यात नमस्कार करण्याचा काय संबंध? पण फक्त नमस्कार न केल्याने वेळेत माझं काम करूनसुद्धा ते मला रोज उशिरा आल्याचा शेरा द्यायचे. त्यामुळे मला एका महिन्यात जवळपास २४ मेमो मिळाले होते. पण तरीही मी नमस्कार केला नाही. माझी तक्रार महाव्यवस्थांपकांकडे गेली. त्यांना सांगितलं मी माफी मागणार नाही कारण ते माफी मागण्यासारखे नाहीत. त्यापेक्षा मी राजीनामा देईन असं त्यांना म्हटलं. ते म्हणाले अशी नोकरी परत मिळणार नाही. त्यांना म्हटलं मी हमाली करणं पसंत करेन पण नमस्कार करणार नाही.
“मी जर चुकीचा नाही तर मी कुठेही झुकणार नाही असा सयाजी शिंदे यांचा सुरुवातीपासूनच स्वभाव राहिल्याचं मकरंदनं स्पष्ट केलं. या कार्यक्रमात सयाजींनी त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा राग येतो हेसुद्धा सांगितलं. ‘उशिरा आल्याचा, खोटं बोलण्याचा, फसविल्याचा, हो म्हणून कामात चालढकल केल्याचा राग येतो. सरकारी कामांमध्ये जी दिरंगाई केली जाते त्याचा खूप संताप येतो,’ असं ते म्हणाले.
ए्खाद्या कलाकाराच्या संघर्षाच्या काळात अनेक काही वेगवेगळ्या घटना असतात. वेगवेगळे अनुभव असतात. यात अपमान फजिती असे अनेक किस्से असतात. या अनुशंगाने या कर्यक्रमात मकरंद अनासपुरेनं सयाजी शिंदे यांना एखादा अपमान लक्षात राहिलेला तुझ्या आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना सयाजी शिंदे यांनी संघर्षाच्या काळातील एक प्रसंग सांगितला. ज्यात त्यांनी आपला स्वाभिमान जपण्यासाठी ३० दिवसांत २४ मेमो येऊनही त्यांनी आपल्या व्यवस्थापकाला नमस्कार केला नाही.
सयाजी शिंदे म्हणाले की, “मी बँकेत कामाला होतो. त्यावेळचे माझे व्यवस्थापक रोज मला ते आल्यावर आणि जाताना त्यांना नमस्कार करायला सांगायचे. मी म्हणालो, मी पण बँकेत काम करतो, तुम्हीपण इथेच काम करता. यात नमस्कार करण्याचा काय संबंध? पण फक्त नमस्कार न केल्याने वेळेत माझं काम करूनसुद्धा ते मला रोज उशिरा आल्याचा शेरा द्यायचे. त्यामुळे मला एका महिन्यात जवळपास २४ मेमो मिळाले होते. पण तरीही मी नमस्कार केला नाही. माझी तक्रार महाव्यवस्थांपकांकडे गेली. त्यांना सांगितलं मी माफी मागणार नाही कारण ते माफी मागण्यासारखे नाहीत. त्यापेक्षा मी राजीनामा देईन असं त्यांना म्हटलं. ते म्हणाले अशी नोकरी परत मिळणार नाही. त्यांना म्हटलं मी हमाली करणं पसंत करेन पण नमस्कार करणार नाही.
“मी जर चुकीचा नाही तर मी कुठेही झुकणार नाही असा सयाजी शिंदे यांचा सुरुवातीपासूनच स्वभाव राहिल्याचं मकरंदनं स्पष्ट केलं. या कार्यक्रमात सयाजींनी त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा राग येतो हेसुद्धा सांगितलं. ‘उशिरा आल्याचा, खोटं बोलण्याचा, फसविल्याचा, हो म्हणून कामात चालढकल केल्याचा राग येतो. सरकारी कामांमध्ये जी दिरंगाई केली जाते त्याचा खूप संताप येतो,’ असं ते म्हणाले.