पनजी : गोवा वृत्तसंस्था – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तूर्तास ते पर्वरी येथील सचिवालयात येऊन काम करतील एवढी त्यांची प्रकृती चांगली झाली नाही असे वृत्त समोर आले आहे. म्हणून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या खाजगी निवासालाच पर्रीकरांचे हंगामी कार्यालय बनवण्यात आले आहे असे गोव्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणले आहे. अर्थात तशी घोषणा करण्यात आली नाही पण पुढील काही दिवस पर्रीकर हे आपल्या निवासातूनच आपल्या पदाचा कारभार बघणार आहेत.
दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल असताना जशी त्यांची स्थिती होती त्यापेक्षा आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून पर्रीकर शरीराने अशक्त आहेत. तसेच त्यांना चालण्या फिरण्यासाठी त्रास होतो आहे. त्यांना फिरण्यासाठी व्हील चेअर आहे तर त्यांच्या आहारात पातळ पदार्थांचा समावेश आहे असे गोव्याच्या तीन आमदारांनी आपले नाव उघड नकरण्याच्या सबबीवर माध्यमांच्या विश्वसनीय सूत्रांजवळ सांगितले आहे.
पर्रीकर यांच्या नाकात ट्यूब घातलेली आहे त्यामुळे त्यांना सचिवालयात घेऊन जाणे शक्य नाही त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होई पर्यंत त्यांच्या करंजाळे येथील खाजगी निवासात ठेवणेच डॉक्टरांनी पसंत केले आहे. सचिवयातील अधिकारी आणि त्यांचे विश्वसनीय आमदार त्यांना त्यांच्या घरीच जाऊन भेटतात तसेच त्यांच्या सेवेसाठी १० लोकांची टीम तैनात करण्यात आली असून त्यांच्या प्रकृतीची दक्षता बाळगण्यासाठी त्यांच्या सोबत डॉक्टरांची एक टिम देण्यात आली आहे.
पर्रीकर सहसा कोणाशी जास्त बोलत नाहीत परंतु एकदा महत्वाचा फोन ते घेतात. त्यांच्या मंत्रालयातील केबीन मधील दोन अधिकारी नेहमी पर्रीकरांच्या बंगल्यावर असतात त्यांच्या कडून फाईलवर स्वाक्षऱ्या उमठवून घेणे तसेच अधिकाऱ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणणे तसेच त्यांचे निरोप अधिकाऱ्यांना देणे हि कामे अधिकारी करतात. परंतु मागील चार महिन्यापासून पर्रीकरांनी कसलीही पत्रकार परिषद घेतली नसून त्यांनी मागील २ महिने कसलाच व्हिडीओ संवाद साधला नाही. पर्रीकरांनी राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान व्हिडीओ कॉन्फरन्सींद्वारे भुषविले हा मागच्या काळात त्यांच्या मंत्र्याने केलेला दावा कुणालाच खरा वाटला नाही , उलट त्या दाव्याची विरोधकांकडून टिंगल उडवली गेली.
भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पर्रीकर दिवाळी नंतर मंत्रालयात येतील असे वक्तव्य केले होते परंतु नाताळचा सण झाल्या शिवाय पर्रीकरांच्या मंत्रालयात येण्याची शाश्वती देता येणार नाही असेच चित्र सध्या दिसते आहे.