औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – मनुस्मृती कायदा संहितेने स्त्रीला व्यक्तित्वहिन व अस्तित्वहिन करून टाकले होते. राजर्षी शाहू महाराजांनी मात्र मनुच्या कायद्याला झुगारून राज्यात महिलांना माणूस म्हणून अस्तित्व प्रदान करणारे असंख्य कायदे करून चळवळीदेखील उभारल्या, असे मत प्रसिद्ध कवयित्री तथा स्त्रीवादी अभ्यासक डॉ. प्रतिभा अहिरे यांनी व्यक्त केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हर्सूल येथील महिला कला महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्रातर्फे आयोजित विद्यार्थी उद्बोधन शिबिरात ‘महिला सबलीकरण आणि राजर्षी शाहू महाराज’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शेख शमीम होते.
शिबिराचे उद्घाटन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य प्रभाकर पालोदकर यांच्या हस्ते झाले. पालोदकर आणि अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. राजेश करपे यांनीही भाषणे केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुरेखा जाधव-मराठे यांनी शिबीर आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. प्रा. योगेश कवडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सतीश फुन्ने, प्रा. इरफान शेख, प्रा. साधना पाटील, प्रा. ज्योती खोत, प्रा. अर्चना खिराडे, प्रा. सुलभा गिराम, प्रा. असिफिया सिद्दीकी, प्रा. अमोल औटे, प्रा. वैशाली कान्हेकर, प्रा. सुभाष वाघ, मनीष मोरे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. प्रा. शेख मुख्तार यांनी सूत्रसंचालन केले.