पुणे : बहुजननामा ऑनलाईन-माओवाद्यांमध्ये झालेल्या पत्रव्यवहारात उल्लेख झालेला मोबाइल नंबर कोणाचा हे अजूनही तपासण्यात आलेले नाहीये. त्यामुळे काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांचा तो नंबर आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
३१ डिसेंबर २०१७ ला शनिवारवाडा येथे झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे दोन गटांमध्ये हिंसाचार झाला होता. त्यावेळी पुणे पोलिसांनी या प्रकरणी देशभरात छापे टाकून नक्षलवाद्यांच्या ताब्यातील कागदपत्रे, लॅपटॉप, मेमरी कार्ड जप्त केली आहेत. त्यात कॉम्रेड प्रकाश आणि सुरेंद्र गडलिंग यांच्यातील झालेल्या पत्रव्यवहारात काही मोबाईल क्रमांक पोलिसांना आढळले होते त्यापैकी एक क्रमांक दिग्विजयसिंह यांचा असल्याची चर्चा सुरू होती.
विशेष म्हणजे माओवाद्यांमध्ये झालेल्या पत्रव्यवहारात उल्लेख झालेला मोबाइल नंबर हा काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांचा आहे. अशी चर्चा होत असतांनाही पोलिसांनी अद्यापही या बाबत चौकशी केलेली नाही. मात्र एल्गार परिषद प्रकरणी कोणत्याही राजकीय नेत्यांचा तपास करीत नसून प्रतिबंधित सीपीआय माओवादी संघटनेच्या सदस्यांवर तपास केंद्रित केल्याची माहिती सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडके यांनी दिली.
इतकेच नव्हे तर या प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आहे जप्त केलेल्या पत्रांमध्ये काही मोबाईल क्रमांक दिले आहेत. त्याबाबत तपास सुरू असून त्यात कोणाचा सहभाग आढळून आल्यास पुढील कार्यवाही केली जाईल. असे पोलीस आयुक्त सुहास बावचे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी कोरेगाव-भीमा दंगलीशी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न आहे. इतकेच नव्हे तर पुणे पोलिसांचा प्रयत्न मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करण्यासाठी आहे. असा आरोप त्यांनी केला आहे. याचबरोबर शहरी नक्षलवाद हा शब्द राजकीय फायद्यासाठी वापरून कट्टरतावाद यांपासून लोकांचे लक्ष दुसरी कडे वळावे हा भाजप सरकारचा कट आहे. पुणे पोलीसही यात त्यांना मदत करत आहेत असेही त्यांना म्हंटले आहे.