नवी दिल्ली : वृत्तसंस्था- केंद्र सरकारने विजेचे युनिट दर कमी करण्यासाठी राज्य सरकारला पत्र लिहिले असून तुमचे विजेचे बिल कमी होण्याची शक्यता आहे. स्मार्ट प्री-पेमेंट मीटर बसवल्याने वीज कंपन्यांचे नुकसान कमी झाले असून त्यांना विजेचे पैसे आधीच मिळत आहेत. तसेच त्यांची वर्किंग कॉस्ट कमी झाली आहे. देशात २५ कोटी इलेक्ट्रिक मीटर ग्राहक असून त्यातील १० लाख लोकांपर्यंत इलेक्ट्रिक मीटर पोहोचला आहे. याच १० लाख लोकांच्या अभ्यासानुसार या कंपन्यांना फायदा होत असल्याचे समोर आले आहे. यामुळेच केंद्रीय वीज मंत्रालयाने सर्व राज्यांना वीज दर कमी करण्यासाठी पत्र पाठवले आहे.
एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार यांनी “स्मार्ट मीटरमुळे कंपन्यांना दरमहा २०० रुपये फायदा होत असून कंपन्यांनी ग्राहकांना याचा लाभ द्यायला पाहिजे. तसेच एका अभ्यासानुसार १७ टक्के लोकं बिल भरत नाहीत अथवा तेथील सरकारला त्यांच्या बिलाचे पैसे मिळत नसतील. जर का एक युनिट ५ रुपयाचे असेल तर जवळजवळ १ लाख कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. पण २५ कोटी लोकांपर्यंत स्मार्ट मीटर पोहोचले तर होणारे नुकसान थांबेल, असे म्हणाले आहेत.
तसेच वीज वितरण कंपन्यांकडून वीज उत्पादन कंपन्यांना पैसे मिळण्याची खात्री असून त्याचा फायदा उत्पादन कंपन्यांना होत आहे. त्यामुळे ते पण वीज दर कमी करतील अशी शक्यता आहे. तसेच स्मार्ट मीटरमुळे कंपन्यांच्या बिलासंबंधित वादही कमी झाले असून त्याचा परिणाम दिसत असल्याचे अभ्यासानुसार समोर आले आहे.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा