गोल्ला-गोलेवार यादव समाजाचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, भाजपा सरकारने अनेक आश्वासने दिली. मात्र त्याची पुर्तता केली नाही. जे बोलले ते केले पाहिजे, जे करता येते तेच बोलले पाहिजे. समाजाच्या प्रश्नासाठी सर्व समाज एकवटतो. समाजात गुणवंत आहेत; परंतु संधी मिळणे आवश्यक आहे. सरकार गंभीर प्रश्नावर सकारात्मक नाही. सरकारची संवेदनशीलता संपली आहे.
तत्पूर्वी कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी जिल्ह्याच्या नेत्यांच्या वेळेवर उपस्थित राहण्याबाबत टोला मारला होता. समाजाचे प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडून, त्याची सोडवणूक करण्याचे आश्वासनही ना. निलंगेकर यांनी दिले. नांदेडला या कार्यक्रमाला येत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनाचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याची सूचना दिली. तसेच समाजाच्या प्रश्नांची सोडवणुकीच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करता येतील, याची माहिती घेण्याची सूचनाही त्यांनी केली. हे समाजाचे व्यासपीठ आहे, येथे राजकारणाच्या गप्पा करणे योग्य नाही.
समाजाचे प्रश्न एका दिवसांत निर्माण होत नाहीत. परंतु निर्माण झालेले प्रश्न वेळच्या वेळी संबंधित सरकारने धसास लावल्यास विकासाची दरी कमी होते. गेल्या ६० वर्षांपासून समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून धसास लावेन. आमचे सरकार नेहमी तुमच्या पाठीशी आहे, असे त्यांनी सांगितले. ६० वर्षांपासून रखडलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही गती दिली. आम्ही बोलनारे नाहीत, करणारे आहोत. समाजातील प्रमुख लोकांना एकत्रित करा, शासनाचा प्रतिनिधी म्हणून येत्या १५ फेब्रुवारीपुर्वी मी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन निलंगेकर यांनी दिले.
गोल्ला-गोलेवार यादव समाजाचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, भाजपा सरकारने अनेक आश्वासने दिली. मात्र त्याची पुर्तता केली नाही. जे बोलले ते केले पाहिजे, जे करता येते तेच बोलले पाहिजे. समाजाच्या प्रश्नासाठी सर्व समाज एकवटतो. समाजात गुणवंत आहेत; परंतु संधी मिळणे आवश्यक आहे. सरकार गंभीर प्रश्नावर सकारात्मक नाही. सरकारची संवेदनशीलता संपली आहे.
तत्पूर्वी कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी जिल्ह्याच्या नेत्यांच्या वेळेवर उपस्थित राहण्याबाबत टोला मारला होता. समाजाचे प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडून, त्याची सोडवणूक करण्याचे आश्वासनही ना. निलंगेकर यांनी दिले. नांदेडला या कार्यक्रमाला येत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनाचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याची सूचना दिली. तसेच समाजाच्या प्रश्नांची सोडवणुकीच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करता येतील, याची माहिती घेण्याची सूचनाही त्यांनी केली. हे समाजाचे व्यासपीठ आहे, येथे राजकारणाच्या गप्पा करणे योग्य नाही.
समाजाचे प्रश्न एका दिवसांत निर्माण होत नाहीत. परंतु निर्माण झालेले प्रश्न वेळच्या वेळी संबंधित सरकारने धसास लावल्यास विकासाची दरी कमी होते. गेल्या ६० वर्षांपासून समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून धसास लावेन. आमचे सरकार नेहमी तुमच्या पाठीशी आहे, असे त्यांनी सांगितले. ६० वर्षांपासून रखडलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही गती दिली. आम्ही बोलनारे नाहीत, करणारे आहोत. समाजातील प्रमुख लोकांना एकत्रित करा, शासनाचा प्रतिनिधी म्हणून येत्या १५ फेब्रुवारीपुर्वी मी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन निलंगेकर यांनी दिले.