पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सत्ताधारी पक्षातील लोकांकडून वारंवार संविधानाचा अपमान केला जात आहे. येत्या निवडणुकीत पुण्यातील आठही जागा लढवणार असल्याचं वक्तव्य भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ यांनी केलं आहे.
दत्ता पोळ म्हणाले की, “सत्ताधारी पक्षांकडून सतत संविधानाचा अपमान होत आहे. त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत भीम आर्मी समविचारी पक्षांसोबत आघाडी करणार आहे. जर आघाडी झाली नाही तर येत्या निवडणुकीत पुण्यातील आठही जागा लवढवणार.” असे त्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी दत्ता पोळ पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “सत्ताधारी पक्ष लोकशाहीचा गळा घोटत आहेत. त्यांच्याकडून संविधान बदलण्याचीही भाषा केली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा येत्या निवडणुकीत पाय उतार करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही समविचारी पक्षासोबत आघाडी करणार आहोत. नाही तर आठही जागा आम्ही लढवणार आहोत.”