सातारा : बहुजननामा ऑनलाइन – ‘लोकशाहीची प्रक्रिया ही दर पाच वर्षांनी राबविली जाते. या निवडणुका अटळ असतात. माझ्या मनावर जे दडपण होत, ते आता नाहीस झालं आहे. त्यामुळे मी आता मोकळ्या मनाने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सज्ज आहे,’ अशी प्रतिक्रिया देत उदयनराजे भोसले यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सातारा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
उदयनराजे म्हणाले कि, ‘लोकांचे प्रश्न ,मार्गी लावणं हे माझं कर्तव्य आहे. आदरणीय शरद पवार साहेब हे सगळ्यांनाच मंत्रिपद देऊ शकत नाही, तरी राजकारण करणं हा माझा पिंड नाही , त्यामुळे मी कधीच मंत्रिपदाची अपेक्षा केली नाही. माझ्या मतदारसंघातील अनेक वर्षांपासून खोळंबलेली काम मी मार्गी लावणार आहे. त्यावेळीदेखील मी दुष्काळी भागाला न्याय मिळवून देण्याची मागणी मी मुंडे साहेबांना केली होती. आघाडी सरकारनं कोणतीही काम मार्गी लावली नाही. अटलजींनी नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. तरी १९९६ पासून कृष्णा नदीच्या खोऱ्याची काम मार्गी लागलेली नाही.’
दरम्यान सातारा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील यांनी ३ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. साताऱ्यात पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर येत होते. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कऱ्हाड मतदार संघातून चव्हाणांना उमेदवारी जाहीर झाल्याने शरद पवार यांनी श्रीनिवास यांना या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. यासाठी ३ ऑक्टोबरला श्रीनिवास उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Visit : bahujannama.com