पुणे : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येकाची नजर तरुण मतदारांवर आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यामध्ये (हडपसर )दौऱ्यावर आले असून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत. काँग्रेसने लोकसभेच्या तोंडावर न्याय योजनेचि घोषणा केली होती या योजनेसाठी ७२ हजार कोठून आणणार ? असा सवाल एका विद्यार्थ्याने राहुल गांधी यांना विचारला. यावर राहुल गांधी म्हणाले कि, नीरव मोदी, विजय मल्ल्या, अनिल अंबानी आणि मेहुल चोक्सीकडून पैसे घेऊन गरिबांना देणार आहे.
दरम्यान , ७२ हजार रुपये देण्यासाठी आयकर वाढवला जाणार नाही याची हमी मी देतो, सर्वसामान्यांना कोणताही फटका बसणार नाही, असे त्यांनी सांगितले.भारतातील तरुण दिवसाला २४ हजार तरुण नोकऱ्या गमावत आहे, आपल्या देशात स्किलचा आदर केला जात नाही. तर चीन सातत्याने आपल्या देशात रोजगार तयार करत आहे अशी खंत राहुल गांधींनी व्यक्त केली. नोटबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांनी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे .नोटाबंदी एक जखम असून त्याच्यावर काहीच उपचार नाही. परंतु, आम्ही अर्थव्यवस्थाला उभारी देण्याचेच काम करू, असे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे.