मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबून टाकल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख व शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी (दि. 9) विधानसभेत केला आहे. यावर फडणवीस यांनी उत्तर देताना म्हणाले की, माझे तुम्हाला खुले आव्हान आहे की माझी खुशाल चौकशी करा. कर नाही त्याल डर कशाला. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालणारे नाही, त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय़ आलेला असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यानंतर सभागृहातील प्रचंड गोंधळामुळे कामकाज काही वेळासाठी अध्यक्षांकडून तहकूब करण्यात आले.
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2018 मध्ये अन्वय नाईक व त्यांच्या आईने सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. फडणवीस यांनी हे प्रकरण दाबून टाकले. त्यानंतर हे प्रकरण हे ठाकरे सरकारकडे आले आहे. अन्वय नाईक यांच्या पत्नीने मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र लिहले आहे की, माझ्या नवऱ्याने व सासूने आत्महत्या केलेली आहे. पण फडणवीस यांनी ते प्रकरण दाबलेल आहे, असे त्यांनी सांगितलं आणि त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी सुरू केली आहे. ती चौकशी सचिन वाझे करत होते. मात्र वाझेंकडे ही चौकशी राहू नये, ही जर चौकशी झाली तर फडणवीस अडचणीत येतील. म्हणून वाझेला टार्गेट केल जात आहे. माझी सरकारला विनंती आहे की, वाझेला हटवू नका यांची चौकशी करा, असे जाधव म्हणाले. यावर फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक आत्महत्येचे प्रकरण दाबल असल्याचे म्हणत त्याची आम्हाला चौकशी करायचे असल्याचे देशमुख म्हणाले.
यावर फडणवीस म्हणाले, भास्कर जाधव आम्हाला धमक्या द्यायच्या नाही, आम्ही धमक्यांना घाबरणारी लोक नाहीत. करा आमची चौकशी, आम्ही धमक्यांना घाबरत नाही. पण सचिन वाझेवर कारवाई का नाही? त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तक्रार त्यांची पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी दिली. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे, अन्वय नाईक प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना दाबल असे बोलून जाधव यांच्या आरोपाला दुजोरा दिला आहे.