मुंबई बहुजननामा ऑनलाइन : ‘उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाने आम्हाला आनंदच होईल , तरी भाजप पक्षात प्रवेश करण्याचा सर्वस्वी निर्णय हा त्यांच्याच असेल’. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना हि प्रतिक्रिया दिली. संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु असलेली महाजनदेश यात्रा सध्या भुसावळ मध्ये पोहोचली होती, त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्यांवर आपले मत मांडले.
काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी मुख्यमंत्री यांची यांच्या ‘वर्षा’ निवास्थानी भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीमुळे उदयनराजे यांच्या भाजप पक्षाची चर्चा सुरु होती. उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता . मुख्यमंत्री म्हणाले कि, ‘ उदयनराजे हे अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. परंतु सातारा तसेच पश्चिम महाराष्ट्रात म्हणावी तेवढी विकास कामे झाली नाहीत , उदयनराजे आमच्याकडे आले असता , राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला , तसेच अनेक सिंचन प्रकल्प मंजूर केले . उदयनराजे यांनी आधीही म्हंटले कि, आमच्या सरकारच्या वेळेत एवढी कामे झाली नाहीत , जी युती सरकारच्या वेळेत झाली. त्यामुळे भाजप पक्षात येण्याचा सर्वस्वी निर्णय हा त्यांच्याच असेल , ते पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल.’
भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे यांनी म्हंटले कि, ‘ मी लोकांचं हित पाहून निर्णय घेईल. मी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. परंतु आमच्या मध्ये साताऱ्यातील विकासकामांसंदर्भात चर्चा झाली . पूर्वी काम जलद गतीनं होत नव्हती, परंतु मुख्यमंत्र्यांनी खूप कामे केली आहेत. तसं पाहिलं तर प्रत्येक पक्षात माझे जवळचे संबंध असलेले नेते आहेत, म्हणून मी लगेच त्यांच्या पक्षात प्रवेश करत नाही. मी माझ्या मनाला पटेल असेच निर्णय घेतो, त्यामुळे आता देखील मी लोकांच्या हिताचाच विचार करून निर्णय घेईल. ‘काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा अनेक नेत्यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच आता २१ ऑगस्ट रोजी उदयनराजे आणि मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे. तरी उदयनराजे यांनी हि भेट साताऱ्याच्या विकासकामांसाठी असल्याचे सांगितले.