औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – भाजप आणि शिवसेनेची युती झाली मात्र आह्माला जागा देण्याबाबत कसल्याही प्रकारची चर्चा झाली नाही . हा प्रकार आमच्यासाठी धक्कदायक असून यांमुळे रिपाइं कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजी आहे. असे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, यांनी म्हटलं आहे. औरंगाबादमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.रिपाइंला लोकसभेला किमान एक जागा मिळायला हवी, दक्षिण मध्य मुंबईची जागा आम्हाला हवी असल्याची इच्छा आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.यामुळे आम्ही नाराज झालो आहोत,असं आठवले यांनी सांगितले आहे.
आम्ही भाजपचा सन्मान करतो, त्यांनीही आमचा सन्मान करावा, आम्ही कुणाला जिंकवू शकत नाही हे जरी सत्य असलं तरी आम्ही कुणालाही पाडू शकतो असं सूचक वक्तव्यही आठवले यांनी केले. त्यामुळे आम्हाला कुणीही वापरून घेवू नये, असही आठवले यांनी म्हटलं.