मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्र विधानसभेच्या निकालांनंतर दोन्ही देशमुख बंधूंना यश मिळालेलं आहे. अमित देशमुख आणि धीरज देशमुख जे त्यांचे वडील विलासराव देशमुख यांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. दोघेही लातूर शहर व लातूर ग्रामीणमधून विजयी झाले आहेत. विजयानंतर बॉलिवूड अभिनेता आणि विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख यांनी ट्विटरवरुन आपल्या भावांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांचीही आठवण केली. विलासराव देशमुख दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
We did it PAPPA!!! @AmitV_Deshmukh wins Latur (city) by 42000+ votes for the 3rd consecutive time.@MeDeshmukh wins Latur (rural) by 1,20,000 votes.
Thank you people of Latur for this faith & trust. pic.twitter.com/pOGFsmoEJU
— Riteish Deshmukh (@Riteishd) October 24, 2019
रितेश यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “आम्ही करून दाखवले पप्पा, अमित देशमुख यांनी लातूर शहर जागा सलग तिसऱ्यांदा ४२ हजार मतांनी जिंकली, तर धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघ १. २० लाख मतांनी जिंकला. लातूरच्या जनतेचे खूप आभार, ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि खूप प्रेम केले.” ट्विटबरोबरच रितेशने दोन फोटोदेखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये एकामध्ये तो खूप गंभीर दिसत आहे, तर दुसर्या फोटोमध्ये हे तीन भाऊ एकत्र निवडणूक प्रचारासाठी आहेत.
धीरज देशमुख यांनी आपली राजकीय कारकीर्द लातूर येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरू केली आणि आता ते आमदार झाले आहेत. धीरज यांनी १.२१ लाख मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळविला. त्याचबरोबर त्याचा मोठा भाऊ अमित यांनी सलग तिसर्या वेळी लातूर शहरात आपली जागा कायम ठेवली आहे. ते ४० हजार मतांच्या फरकाने जिंकण्यात यशस्वी झाले आहेत. उल्लेखनीय आहे की विलासराव देशमुख जे १९९९ ते २००३ आणि नंतर २००४ ते २००८ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, लातूर हा त्यांचा मूळ जिल्हा आहे.