मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा लाखांहून अधिक मतांनी दारुण पराभव झाला. आपल्या पराभवानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देत म्हंटले कि, ‘निवडणूक हरलो आहे, पण संपलो नाही,’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. यांच्या या ट्विटची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे.
आज हरलो आहे पण थांबलो नाही,
जिंकलो नाहीं पण संपलो ही नाही.लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार.
सदैव आपल्या सेवेशी तत्पर. pic.twitter.com/yFe2RdssiU— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) October 25, 2019
पोटनिवडणुकीत मला मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखो मतदारांचे व दिवसरात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप आभार. आपल्या सेवेशी सदैव तत्पर,’ असंदेखील त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी पक्षांतर करत भाजप -शिवसेनेत प्रवेश केला. त्यात उदयनराजे यांनीदेखील अवघ्या तीन महिन्यांत खासदारकीचा राजीनामा देऊन ते भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं तिथं पोटनिवडणूक जाहीर झाली. विधानसभेच्या निवडणुकीसोबतच ही निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे भाजपकडून उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील हे मैदानात उतरले होते.
दरम्यान उदयनराजें यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्यात सभा घेतली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाजूने असणाऱ्या साताऱ्यातील जनतेने उदयनराजे यांना पुन्हा संधी देण्यास नकार दिला. त्यात पवारांचं पावसातील भाषण आणि सातारकरांची माफी मागून चूक सुधारण्याची केलेली विनंती जनतेच्या मनाला भावली. त्यामुळे जनतेने ‘कॉलर’ऐवजी स्कॉलरला पसंती दिली.