मुंबई बहुजननामा ऑनलाईन – ज्यांनी मतदान केले. त्याला आपण कोणाला मतदान केले किंवा ज्याला मतदान केले. त्याच उमेदवाराला केलं का हे समजलं पाहिजे. ईव्हीएमसर व्हीव्हीपॅट मशिनवर अनेक प्रकारच्या शंका निर्माण होतात. एकंदरीत जनतेत संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे पारदर्शक निवडणूकांसाठी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरच हवा असं मत अजित पवार यांनी ईव्हीएमविरोधात विरोधी पक्षातील नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.
अजित पवार म्हणाले, भाजपातले सत्ताधारीही एवढ्या जागा येतील , तेवढ्याच जागा येतील असा अंदाज व्यक्त करत आहेत. तशाच प्रकारे त्यांच्या जागा निवडून येत आहेत. लोकशाहीमध्ये असं घडता कामा नये. लोकशाहीत जनतेनं एखाद्या नेत्याला नक्की निवडून द्यावं परंतु ईव्हीएमबाबत अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. देशातल्या विरोधकांसह काही एनजीओंनाही याबाबत संभ्रम आहे. पारदर्शकतेसाठी निवडणूका या ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात असंही ते म्हणाले.
अनेक मान्यवरांनी निवडणूकांमध्ये ईव्हीएमच्या वापराबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. इंदिरा गांधींनाही जनतेनं निवडून दिलं. त्यामुळे निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरच्या माध्यमातून माध्यमातून निवडणूक घेण्यास प्राधान्य दिलं जावं. माझ्या कुटुंबात सात मतं होती. त्यापैकी फक्त पाचंच मतं पडली अशी शक्यता काहींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जनतेची मागणी म्हणून ती पुढे यावी. जनतेने प्रतिसाद दिला तर निवडणूक आयोग वेगळा विचार करू शकते. असंही ते यावेळी म्हणाले.
राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत २१ ऑगस्ट रोजी मुंबईत ईव्हीएमविरोघात जन मोर्चा काढला जाणार आहे. विरोधकांनी एकत्र येत निवडणूका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे यासाठीच या आंदोलनात जनतेकडून फॉर्म भरून घेतले जाणार आहेत.