बहुजननामा ऑनलाईन – ईव्हीएम घोटाळ्या विरोधात मोर्चा काढण्याची जोरदार तयारी सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा काढण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे. ते म्हणाले की ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याऐवजी जनतेत जा तुम्हाला तिथे सहानुभूती मिळेल. असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेच ईव्हीएमच्या प्रकरणावर तुम्ही कितीही एकजूट केली तरी त्यावर काहीच फरक पडणार नाही. असही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान मुख्यमंत्री वर्धा येथे महजनादेश यात्रेच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की दुष्काळ निवारण हे आमचे यापुढील काम आहे. गेल्या ५ वर्षात त्यांनी काय काम केलं हे सांगत असतानाच त्यांनी विरोधकांवर ईव्हीएम बाबत टोला लगावला. ते म्हणाले की ईव्हीएमवर अविश्वास म्हणजे सरळसरळ जनतेवर अविश्वास दाखवणे होय. त्यामुळे त्यांनी एकजूट करून किती मोर्चे काढले तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. असेही त्यांनी सांगितले.
शेवटी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की जी कामे आम्हाला गेल्या ५ वर्षात जमली नाहीत. ती कामे आम्ही येत्या काळात पूर्ण करू आणि येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप – शिवसेना युतीला नक्कीच विजय मिळेल. असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.