मुंबई बहुजननामा ऑनलाइन : गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. महाराष्ट्रातील पूरस्थितीही आटोक्यात आली आहे. परंतु आगामी काळात महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार असून विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे. तर गुरुवारी मराठवाड्यात हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबईत देखील पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती, परंतु गुरुवार आणि शुक्रवारी येथे हलक्या सरींची शक्यता आहे.
महाराष्ट्रात बऱ्याच भागात चांगला पाऊस पडला आहे. काही जिल्ह्यांना या पावसाचा फटका देखील बसला आहे. परंतु मराठवाड्यात अजूनही २४ टक्के पाण्याची कमतरता आहे. गेल्या २४ तासांत विदर्भ , कोकण आणि गोवा या प्रदेशात पावसाने हजेरी लावलेली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट ला मध्य महाराष्ट्र , गोवा , कोकण तसेच विदर्भात हलक्या सरींची नोंद केली आहे. तसेच २३ आणि २४ ऑगस्ट रोजी विदर्भ , मराठवाडा सारख्या अन्य अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडेल .
इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजीने ‘ दामिनी’ या नावाने अप्लिकेशन विकसित केले आहे. आयआयटीएमच्या वतीने यासाठी केरळ, ओरिसा तसेच इतर ४८ ठिकाणी सेन्सर बसविले आहे. ज्यामूळे वादळ आणि वाऱ्यांचा इशारा मिळण्यास मदत होत आहे. ३० मिनिटांपूर्वी या संबंधित माहिती मिळत असून ४० किलोमीटर परिसरातील माहिती ऑडिओ आणि एसएमएसद्वारे मिळते.