अकोला बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. असं मत वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी अकोल्यात व्यक्त केले. आज अकोल्यात विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडे विधानसभेच्या १०० जागांची मागणी केल्याचे बोलले जात आहे. परंतु अद्यापतरी एमआयएमकडून प्रत्यक्षात यासंदर्भात कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही. लोकसभेच्या निकालानंतर आमच्यात कोणतेही मतभेद झाले नाहीत. असेही ते म्हणाले.
लक्ष्मण मानेंशी मतभेद आहेत. परंतु मनभेद नाहीत असं सांगत मानेंनी आपल्या भूमिकेचा विचार करावा असेही अण्णाराव पाटील म्हणाले. अकोल्यातली जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर आज वंचित बहुजन आघाडीच्या संसदिय मंडळांने मुलाखती घेतल्या. जवळपास १२५ इच्छुकांनी मुलाखत दिली. यापुर्वी नागपूर, अमरावती येथे मुलाखती घेण्यात आल्या आहेत.