मुंबई बहुजननामा ऑनलाईन – निवडणूक आयोग आणि मुंबई उच्च हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या तिघांनीही ईव्हीएमबाबत हॅक होऊ शकत नाही असा दावा केला आहे. डिसेंबर २०१८ साली इलेक्शन कमीशनचं पुस्तक आहे. प्रेझेंटेशन ऑफ इव्हीएम अँड व्हीव्हीपॅट या पुस्तकात ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं म्हटले आहे. मग निवडणूकीत झालेली मते आणि मतमोजणीत आलेली मतं जास्त कशी निघाली. हे रिटर्निंग ऑफिसरला विचारावं. आम्ही हाच मुद्दा घेऊन ३१ मतदारसंघांबाबत निवडणूक याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत.
महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये जेवढं मतदान झालं तेवढं मतदान मतमोजणीत निघालं नाही. अशा स्थितीत नियमावली असं म्हणतं की ही सगळी स्थिती इलेक्शन कमीशनला रिटर्निंग अधिकाऱ्याने कळविणे गरजेचे आहे. मी इलेक्शन कमीशनला भेटायला गेलो. तेव्हा कुणी असा रेफरन्स इलेक्शन कमीशनकडे केलं का? तेव्हा अधिकाऱ्यांनी असा कुणी रेफरन्स केला नाही. कायद्याप्रमाणे रिटर्निंग ऑफिसरला निकाल जाहीर करण्याचा अधिकार नाही. अशा स्थितीत तुम्ही काय कराल ? असं विचारलं. तर इलेक्शन कमिशन त्याचं उत्तर देत नाही.
३१ निवडणूक पिटीशन दाखल
जेवढं मतदान झाले तेवढं काऊंटींगमध्ये निघालं नाही. तर निकाल जाहीर करण्याचे अधिकार काढून घेतले आहेत. त्याचे काढलेले अधिकार वापरले असतील तर हे इलेक्शन रद्द करण्यात यावं. रिटर्निंग उमेदवाराचं जे नाव आहे. रद्द करण्यात यावं. अशा ३१ निवडणूक पिटीशन आम्ही टाकले आहेत. काही ठिकाणचे पिटीशन टाकता आले नाहीत. कारण तेथील रिटर्निंग अधिकारी मतदान झाल्याची आणि मोजलेल्या मतांची माहिती दिली नाही.
मी अनेक पक्षांशी यासंदर्भात बोललो असून त्यांनी असे पिटीशन दाखल करावेत असे आवाहन केले आहे. मात्र अशा पिटीशन दाखल कऱण्यासंदर्भात आम्हाला बी टीम म्हणणाऱ्या कॉंग्रेसला नेमका ईडीचा, इन्कम टॅक्सचा साप चावला आहे का ? असा सवालही विचारला.
कोर्टाने आपली अब्रू वाचविण्यासाठी लवकर निकाल द्यावा
ईव्हीएमच्या बाबतीत अनेक पक्षांनी आंदोलनं केली. मात्र कोर्टाच्या निकालानंतर आंदोलनं बंद केली. मात्र आता राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये जो डिफरन्स निघाला आहे. त्याबाबत आम्ही ३१ पिटीशन दाखल केले आहेत. त्यामुळे कोर्टाने आपली अब्रू वाचविण्यासाठी लवकर निकाल द्यावा.
मी वन मॅन आर्मी
तुमचं ईव्हीएमबाबत शरद पवार यांच्याशी एकमत आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर माझं कुणाशी एकमत नाही. मी वन मॅन आर्मी आहे असं उत्तर त्यांनी दिलं.