लखनऊ वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी रस्त्यावर नमाज पठण आणि आरती करण्यास मनाई केली आहे. पोलीस महासंचालक ओपी सिंग यांनी हा आदेश दिला आहे. सिंग यांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी अश्या काही गोष्टी न करण्याची परवानगी दिली जाऊ शकते कि, ज्यांमुळे सामान्य जीवनात व्यत्यय निर्माण होऊ शकतो.
ओपी सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, धार्मिक स्थळी जेव्हा पण नमाज किंवा आरती ची व्यवस्था असते तेव्हा कोणीही रस्त्यावर येऊ नये, जेणेकरून सामान्य जीवनात व्यत्यय येणार नाही. त्यांनी हि सूचना सर्व जिल्हात लागू केली आहे.
सिंह म्हणाले, या प्रकरणाच्या तोंडी निर्देशानुसार आम्ही असे म्हटले आहे की, शांतता समितीची बैठक बोलावून आणि परस्पर सामंजस्याचे वातावरण निर्माण करून अशी कारवाई सुरू केली पाहिजे. मला वाटतं हा आमचा हा प्रयोग यशस्वी होईल. विशेष म्हणजे, राज्यातील अलीगड आणि मेरठ जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेत रस्त्यांवर धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली होती.