कोलकाता : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणूक प्रचाराने पश्चिम बंगालचे वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपने येथे बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग जोरदार फिल्डींग लावली आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने भाजपच्या बंगालमधील प्रवेशाला बंगाली विरुद्ध बाहरी असा मुद्दा बनवला आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका टीव्ही चॅनलवर स्वतः बाहेरील असल्याशी संबंधित एका प्रश्नावर उत्तर दिले आहे. शाह म्हणाले की, सुभाष बाबू जेंव्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले, त्यावेळी ते गुजरातसाठी बाहेरील होते का? प्रणव मुखर्जी देशाचे राष्ट्रपती झाले, तर ते मध्य प्रदेशसाठी बाहेरील होते का? हा कसला संकुचित विचार आहे, हा बंगालचा विचार असू शकत नाही. हा अत्यंत संकुचित विचार असल्याचे म्हणत शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.
गृहमंत्री शाह यांना एका बंगाली वाहिनीच्या अॅकरने विचारले की आपला पश्चिम बंगाल दौरा आठवड्यातून किमान 2-3 दिवस असतो. तर मग आपण तर येथे एक घर अथवा फ्लॅट विकत घ्यायला हवा. आम्हालाही म्हणता येईल, की देशाच्या गृहमंत्र्यांचे बंगालमध्ये घर आहे आणि आपले विरोधकही आपल्याला बाहरी म्हणणार नाहीत. पत्रकाराच्या या प्रश्नावर शाह म्हणाले, बाहेरील असल्याचाच प्रश्न असेल, तर माझा पक्ष अखिल भारतीय आहे. माझा पक्ष काही स्थानिक नाही. तर मग माझ्या पक्षाचे सर्वच नेते ममता दीदींच्या मते बाहेरीलच झाले. तर मी त्यांना एक छोटा प्रश्न विचारू इच्छितो, की सुभाष बाबू जेंव्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले, त्यावेळी ते गुजरातसाठी बाहेरील होते का? प्रणव मुखर्जी देशाचे राष्ट्रपती झाले, तर ते मध्य प्रदेशसाठी बाहेरील होते का? हा असला संकुचित विचार हा बंगालचा असू शकत नाही, असे ते म्हणाले. तसेच शाह म्हणाले जर माझ्याच दौऱ्याचा प्रश्न असेल, तर बंगालमध्ये आम्ही सर्वाधिक जागांवर निवडणूक लढत आहोत. यामुळे मी येथे अधिक वेळा येणे साहजिकच आहे. पण मला कळत नाही, की मी येथे आल्याने दीदींना काय त्रास होतो? असा सवालही शाह यांनी यावेळी केला आहे.