मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले की, 26/11 च्या मुंबई हल्ल्याची माहिती म्हणून आम्ही कोर्टासमोर 10 ओळखपत्रे सादर केली होती जी बनावट होती. त्यातील एक म्हणजे कसाब आणि इतर 9 आरोपींची कार्डे होती. त्या ओळखपत्रांवर हिंदूंची नावे लिहिली गेली हे खरे आहे. मुंबई हल्ल्यात 10 पैकी नऊ दहशतवादी ठार झाले आणि कसाबला जिवंत अटक करण्यात आली. हल्लेखोर अजमल कसाबला अटक करणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले ज्याने अनेक खळबळजनक खुलासे केले. हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा या मोठ्या जिहादी गटाकडे शंका उपस्थित केली गेली.
#WATCH U Nikam, Special Public Prosecutor in 26/11 Mumbai terror attack case:..We had presented 10 IDs before court,they were fake. It's true that the IDs carried Hindu names.Kasab had given statement in Mumbai court which proved that the 10 accused had 10 fake IDs…We proved it pic.twitter.com/wls4rWRj0V
— ANI (@ANI) February 19, 2020
मुंबई पोलीस मधील माजी आयुक्त राकेश मारिया यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला ‘ हिंदू दहशतवाद ‘ म्हणून रूप देण्याचा कट होता असा दावा त्यांनी केला होता . याच्याशी निगडीतच उज्वल निकम यांनी काही वक्तव्य केली आहेत. म्हणाले अजमल कसाबला बेंगळुरूचा समीर चौधरी म्हणून मारणार असल्याची योजना आखली गेली होती. माजी आयुक्त मारिया यांनी सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ‘Let Me Say It Now’ या आत्मचरित्रात त्यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील स्वत: द्वारा केलेल्या तपासणीचा उल्लेख केला आहे. लष्करने या दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती आणि त्यात पाकिस्तान सहभागी होता असे म्हंटले आहे.
Ujjwal Nikam, Special Public Prosecutor in 26/11 Mumbai terror attack case: As far as 26/11 Mumbai attack is concerned, we had presented 10 ID cards before court, they were fake-one of them was of Kasab&9 others of other accused. It's true that those ID cards carried Hindu names. pic.twitter.com/W5BRuSTcXN
— ANI (@ANI) February 19, 2020
26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला ‘हिंदू दहशतवाद’ म्हणून संबोधण्याची लष्करांच्या योजनेचा संदर्भ देताना माजी आयुक्त मारिया यांनी लिहिले की, “जर सर्व काही योजनेनुसार चालले असते तर कसाबला समीर चौधरी म्हणून ठार मारले गेले असते आणि माध्यमांना या हल्ल्यासाठी ‘हिंदू दहशतवाद्यांना’ दोषी ठरवले गेले असते. दहशतवादी संघटनेने दहशतवाद्यांवर भारतीय पत्त्यासह बनावट ओळखपत्रे लावल्याचा आरोपही त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.