बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबईच्या मायानगरीप्रमाणे अतिसुंदर अशी मायानगरी उत्तर प्रदेशात निर्माण करावी. मायानगरी निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या सरकारने यमुना एक्स्प्रेस जवळ एक हजार एकर जागा दिली आहे. साधुमहाराज आता पुढील कार्यवाहीसाठी मुंबईत आले असं म्हणत उत्तर प्रदेशचे वास्तव आज सामना’च्या अग्रलेखातून मांडण्यात आलं यावर उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी टीका(Uddhav Thackeray falls asleep) केली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या साधू महाराजांचे मुंबई मायनगरीत आगमन झालं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मनाने साधुमहाराज आहेत. ते आॅबेराॅय ट्रायडण्ट चा समुद्र किनाऱ्यावरील मठात निवासाला आहेत.
उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री एस. एन. सिंह यांनी सामना’च्या संपादकीयवर केला निषेध व्यक्त
उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री एस. एन. सिंह यांनी सामना’च्या संपादकीयवर टीका केली. आणि निषेधही व्यक्त केला आहे. यावेळी सिंह म्हणाले, “योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याने उद्धव ठाकरेंची झोप उडाल्याचे दिसत आहे. यामुळे त्यांनी सामना संपादकीयमधून चुकीची भाषा वापरली आहे. त्याचा मी निषेध करतो. कदाचित हे त्यांच्या पक्षाची संस्कृती असेल आम्ही खुल्या दिलाने बॉलिवुडच्या लोकांचे स्वागत करतो. शिवसेना दुसऱ्यांवर बोट दाखवू शकत नाही त्याआधी त्यांनी बॉलीवुड सोबत असलेल्या परंपरेचा अभ्यास करावा. जर त्यांना काही ठेवायचं असेल तर त्यांनी ते जरूर ठेवावं. कोणालाही फिल्मसिटी काढून घ्यायची नाही कारण हे सारं स्पर्धेतून होत आहे. ”
नक्की काय म्हणाले सामनातून…
येथील खरीखुरी मायानगरी ते मिर्झापूरला हलवणार आहेत काय ? उत्तर प्रदेशला सोन्याने मडवा व या सोन्याच्या विटा दिल्लीहून घेऊन या. आमची काहीच हरकत नाही, पण त्यासाठी मुंबईला बदनाम का करता? मुंबईला का ओरबडता? मायानगरी तर दक्षिणेतील अनेक राज्यांत देखील आहे. हैदराबादेत आहे, तामिळनाडू, आंध्रात आहे. योगीमहाराज तेथेही जाऊन उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीचे कार्य पुढे नेणार आहेत का काय? उत्तर प्रदेशचे गुन्हेगारी वास्तव, कायदा आणि सुव्यवस्था याचं जळजळीत चित्र मिर्झापूर १ व २ या वेब सिरीजमध्ये आहे. आता मिर्झापूर ३ ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदच आहे.
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील पुढाऱ्याचे यावर काय मत आहे? की मुंबईला पीओके म्हणणाऱ्या नटीस पाठिंबा दिला तसा या मुंबईत असलेल्या योगींना ही त्यांचा पाठिंबा आहे? एका नटीन मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजप यांची प्यारी बहना झाली. भाजपच्या त्या नटीन पीओके म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात. हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱ्या पीओके ची कायदा व सुव्यवस्था मिर्झापूर पेक्षा वेगळी नाही उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा. कायदा-सुव्यवस्था माय नगरी आपोआप निर्माण होईल असे म्हटले आहे.