पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पंढरपूरहून आळंदीकडे जात असलेल्या संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यात ब्रेक फेल झालेला जेसीबी घुसल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यु झाला असून १५ जण जखमी झाले आहेत़ हा अपघात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता दिवे घाटात झाला.या अपघात संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास (वय ३६) आणि अतुल महाराज आळशी (वय २४) यांचा मृत्यु झाला असून अन्य १५ जण जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर हडपसरमधील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत २४ नोव्हेंबरला सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी राज्यातून विविध ठिकाणाहून दिंड्या येत आहेत. संत नामदेव महाराज दिंडी सोहळा हा दरवर्षी पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करीत होता. आज सकाळी हा दिंडी सोहळा दिवे घाट उतरत असताना पाठीमागून आलेल्या एका जेसीबीचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व जेसीबी दिंडीतील वारकाऱ्यांमध्ये शिरला. त्यात दोघांचा मृत्यु झाला असून एक जण गंभीर आहे़ जखमीवर नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
पंढरपूर वरून आळंदी ला दिंडी निघाली होती. दिवे घाटात तिसऱ्या वळणावर एक जेसीबी आला, त्याचा ब्रेक फेल झाल्याने तो दिंडीत घुसला. दिंडीत एकून 2 ते 3 हजार वारकरी पायी चालले होते. नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज तुळशीदास नामदास, अतुल महाराज आळशी हे दोघे दगावले आहेत. अजून दोघे गंभीर जखमी तर 10 जण किरकोळ जखमी अशी माहिती पालखीचे मानकरी रामभाऊ चोपदार यांनी दिली आहे.
Visit : bahujannama.com