मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून कित्येक दिवस उलटले तरी आद्यपही राज्यात कोणतेही सरकार स्थापन झालेले नाही. अश्या परिस्थिती विरोधी पक्षांवर आरोपांचे सत्र सुरूच आहेत. बहुमत मिळूनही भाजपला सरकार स्थापन करता न आल्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. मलिक निवडणुकीच्या निकालाआधीच्या मेगाभरतीवरून भाजपवर निशाणा साधला असून सत्तेच्या लोभात केलेली ही मेगाभरती महागात पडली असा टोला मलिक यांनी भाजपला लगावला आहे.
दरम्यान, आज दिल्लीत सोनिया गांधी आणि शरद पवार यांची चर्चा झाल्यानंतर पुढील दिशा निश्चित होणार आहे. त्यानंतर राज्यातील आणि दिल्लीतील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेत्यांमध्ये उद्या बैठक होणार असून दिल्लीतील भेटीनंतर ठोस निर्णय घेतल्यानंतर सत्ता स्थापन होईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
तसेच मलिक यांनी मेगाभरतीवरून भाजपला टोला लगावत म्हंटले कि, ‘फक्त सत्तेच्या लोभासाठी भाजपने ही मेगाभरती केली होती. त्यांच्या पक्षातील आमदार त्यांच्या मूळ पक्षाचे नाहीत, तर ते सत्तेसाठी त्या पक्षात गेलेले आहेत.ज्यांच्याकडे सत्ता येईल तिकडे हे आमदार जातील. त्यामुळे आता राज्यातील समीकरण बदलल्याने मेगाभरती केलेले आमदार पुन्हा उलट्या दिशेने जातात की काय अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे ही मेगाभरती भाजपला महाग पडल्याचे मलीक यांनी म्हटले आहे.
Visit : bahujannama.com