बहुजननामा ऑनलाइन टीम – देशभरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जनजगृतीसाठी सगळ्यांच्या मोबाइल फोनवर कॉलर ट्यून सुरु करण्यात आली. मात्र, या कॉलर ट्यूनला प्रत्येकजण वैतागलेला दिसत आहे. अनेक राजकारणीही या कॉलर ट्यूनमुळे वैतागले आहेत. अशातच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांन कॉलर ट्यूनला वैतागून ती बंद करण्याची मागणी केली आहे.
कोरोना व्हायरसबाबत जनजागृती व्हावी, म्हणून मागील पाच महिन्यापासून फोनवर कॉल करण्यासाठी कॉलर ट्यून वाजवली जात आहे. पण आता सामान्य नागरिक या कॉलर ट्यूनला अक्षरश: वैतागलेले आहेत. त्यामुळे ही कॉलर ट्यून बंद करा अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. बाळा नांदगावकर यांनीही याविरोधात आवाज उठवला आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी केली होती.
बाळा नांदगावकर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने मागील अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. मात्र आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही, त्यामुळे जी काही जनजागृती करायची आहे ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोना ची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असलेतरी विलंब होतो अथवा लागत नाही,
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) August 20, 2020